Wednesday, May 30, 2012

               आधाडीतल्या संघर्षाने राज्याचे नुकसान


राष्ट्र्वादीकडे अर्थखाते असल्याने केंद्र सरकारच्या मह्त्वाकांक्षी योजना
राज्यात राबवता आल्या नाहित    अशी काँग्रसच्या मंत्र्यांची तक्रार आहे.
आघाडीची   सत्ता    असलेल्या    राज्यात  केंद्रातील  काँग्रस सरकारच्या
योजनांची अमलबजावणी होत नाही हे अपयश कोणाचे?केंद्र सरकारच्या
योजनांच्या   निधिचेही    वितरण   राज्यात  योग्य प्रकारे होत नाही.त्या
आठ  योजनांच्या  प्रभावी अमलबजाणीवर लक्ष ठेवण्याकरीता काँग्रेसने
समित्या   नेमणे    कितपत    योग्य   आहे?  तर मग केंद्राने राज्यातील
दुष्क़ाळाच्या मदतीसाठीची निधी पाठविल्यास त्या निधिचे योग्य प्रकारे
वितरण   होईल   का?   यांच्यातील वादामुळे दुष्काळी भागात योग्यवेळी
मदत   पोहचली नाही तर तेथील   दाहकता आणखी वाढले.आधाडीकरुन
मिळवलेली   सत्ता एकत्रपणे   कारभार    कारायचे    सोडुन मित्रपक्षाच्या
कारभारावर  अविश्वास   दाखविल्यास   राज्यातील   कामे  कशी होतील?
सत्ताधारी   आधाडीतील    दोन   पक्षातील   कुरधोडीच्या राजकारणातील
राज्यातील   खुपशी   कामे    खोंळबली   आहेत  त्याला जबाबदार कोण?
दुहीचे    राजकारण    खेळत   बसलेल्या   आधाडीतील पक्षांचे राज्याच्या
विकासाकडे   लक्ष   नसल्याने    राज्याची    प्रगती   खुंटली   आहे.  केंद्र
सरकारने  योजनांची   अमलबजावणी   करण्यासाठी   लवकरच   दोन्ही
पक्षात सलोखा करण्याची गरज आहे.




No comments:

Post a Comment