Sunday, May 13, 2012

                    पतमानांकनातली  घट धोक़्याची.
 

  आंतरराष्टीय पतमानांकन संस्थेने भारताचे कमी केलेले मानांकन पूर्वपदावर  आणण्यासाठी देशाने विकासाला चालना देण्याची मोठी  
गरज आहे.  देशाच्या   क्षमतेपेक्षा    कमी वेगाने   विकास होत आहे.
दोलायमान राजकिय परीस्थितीमुळे  देशाच्या आर्थिक सुधारणांची 
गती मंद झाली आहे.देशाच्या गुंतवणुकीचा ओघ मंदावण्याची भिती वाढली आहे.  आर्थिक   विकासाची   मंदावलेली   गती,  धोरणत्मक
निर्णयांच्या बाबतीत   उदासिनता, संदिग्धता व वाढती व्यापारी तूट 

आदि कारणांमुळे भारताचे पतमानाकंन घटले आहे.रुपायाही घसरत 
आहे.  देशाचे पतमानाकंन    घसरल्यास   त्याचा   फ़टका देशातील 
बँकांनाही बसत   आहे.    देश   आर्थिक अरिष्टाच्या तोडांशी आहे. ही 
परीस्थीती  सरकारच्या  निर्णयक्षमतेचा    अभावाने निर्माण झाली आहे.वित्तीय तूट   कमी करण्याच्या दृष्टीने सरकारच्या उपाययोजना आखायला पहिजेत.  विदेशी जुंतवणुक,कर,सुधारणा,अनुदान कमी 
केल्यास देशाची    आर्थिक सुधारणा होईल.सरकारने राजकिय धैर्य
 दाखवित देशाची    जगातील प्रतिमा सुधारल्यास,विकासाचे उद्दीष्ट 
साध्य केल्यास,वित्तीय तूटीवर नियत्रंण ठेवून पतमानाकंनाचा दर्जा सुधारुन देशाला   संभाव्य   धोक्यापासून  बाहेर काढले पाहिजे.मित्र
 व विरोधी पक्षांना विश्वासात घेऊन सत्ताधा-यांनी आर्थिक धोरणांची अमलबजावणी   व   कठोर निर्णय    घेऊन देशाची  आर्थिक स्थिती
सकारात्मक व स्थिर करावी.

No comments:

Post a Comment