Monday, February 16, 2015

सेंद्रिय शेती वाढवा.





         किडीचा     प्रादुर्भाव    न    होण्यासाठी घातक 
किटकनाशके    व   शेतीतील उत्पादन मिळण्यासाठी 
बेसुमार     रासायनिक     खतांच्या     वापराने भाजी 
फळांमघ्ये घातक रसायने आढळली आहेत.ही फळे व 
भाज्या    रोजच्या आहारात  येत असल्याने भयानक 
रोगांचा संसर्ग  वाढला आहे. तसेच   रासायनिकांच्या
मा-याने    जमिनीचा    पोत  बिघडत आहे.परिणामी 
जमिनीची     उत्पादनक्षमता     कमी      असल्याने 
शेतक-याचे  हे  मोठे    नुकसान होत आहे.शेतीमध्ये 
रासायनिक    खते,   कीटकनाशके   व    तृणनाशके 
इत्यादींचा  वापर कमी करून अन्नधान्याचा दर्जा व 
अन्न   सुरक्षा   वाढविण्यासाठी   आणि त्याच वेळी 
उत्पादन      खर्चही    कमी     करण्याच्या     दुहेरी 
दृष्टिकोनातून    सेंद्रीय    शेतीला    उत्तेजन देण्या 
शिवाय  दुसरा पर्याय नाही.सेंद्रिय शेतीत जमीनीचा 
उपयोग     पर्यावरण     रक्षणाच्या  व     सामजिक 
जबाबदारीच्या     जाणिवेने    केला जातो. मातीची 
पुनरुत्पादनक्षमता  सेंद्रिय पध्दतीने  वाढविता येते. 
रोपांचे  योग्य पोषण   करुन रोग प्रतिकारक शक्ती 
असलेली   शेती   उत्पादने तयार केल्यास जनतेचे 
आरोग्य सुधारण्यास मदत होईल.


No comments:

Post a Comment