किडीचा प्रादुर्भाव न होण्यासाठी घातक
किटकनाशके व शेतीतील उत्पादन मिळण्यासाठी
बेसुमार रासायनिक खतांच्या वापराने भाजी
फळांमघ्ये घातक रसायने आढळली आहेत.ही फळे व
भाज्या रोजच्या आहारात येत असल्याने भयानक
रोगांचा संसर्ग वाढला आहे. तसेच रासायनिकांच्या
मा-याने जमिनीचा पोत बिघडत आहे.परिणामी
जमिनीची उत्पादनक्षमता कमी असल्याने
शेतक-याचे हे मोठे नुकसान होत आहे.शेतीमध्ये
रासायनिक खते, कीटकनाशके व तृणनाशके
इत्यादींचा वापर कमी करून अन्नधान्याचा दर्जा व
अन्न सुरक्षा वाढविण्यासाठी आणि त्याच वेळी
उत्पादन खर्चही कमी करण्याच्या दुहेरी
दृष्टिकोनातून सेंद्रीय शेतीला उत्तेजन देण्या
शिवाय दुसरा पर्याय नाही.सेंद्रिय शेतीत जमीनीचा
उपयोग पर्यावरण रक्षणाच्या व सामजिक
जबाबदारीच्या जाणिवेने केला जातो. मातीची
पुनरुत्पादनक्षमता सेंद्रिय पध्दतीने वाढविता येते.
रोपांचे योग्य पोषण करुन रोग प्रतिकारक शक्ती
असलेली शेती उत्पादने तयार केल्यास जनतेचे
आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
No comments:
Post a Comment