Monday, February 16, 2015

वेध लढतीचे

    
   येत्या विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील  भारत आणि 
पाकिस्तान या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची 
तिकिटे   अवघ्या    २०     मिनिटांत   संपली     तेही 
ऑस्टेलियात.क्रिकेट जगतातील  सर्वात  रोमांचकारी 
मॅच     पाहण्यास   सगळेच   उत्सुक आहेत.   भारत 
पाकिस्तानच्या राजकीय संबंधाने  क्रिकेट  दूरावलेले  
असल्याने    हा     सामना      पाहण्यास   जगातील 
क्रिकेटवेड्या चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे.दोन्ही 
देशातील क्रिकेटप्रेमींना आपलाच संघ जिंकावा असे 
वाटत असल्याने दोन्ही संघ जबरदस्त दपडणाखाली 
खेळतात.विजेत्या संघावर स्तुतीसुमने तर हरणा-या 
खेळांडुच्या   घरांवर    हल्ले. स्वतःच्या देशाबद्दलचा 
अभिमान   आणि    शत्रू   राष्ट्राबद्दलचा त्वेष  दोन्ही 
देशांच्या    लोकांमध्ये    ठासून    भरला  असल्याने 
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील हा सामना महत्वाचा 
असतो.  या    सामन्याबाबत  सर्वाधिक   औत्सुक्‍य 
असल्याने   सेटिंग   व   बेटिंग  जोरात   होणार. या 
सामन्याला     महत्व     देण्यापेक्षा       विश्वचषक 
जिंकण्याचा    विचार    आपल्या    खेळाडुंनी   केला 
पाहिजे. पण   भारत पाकिस्तान   सीमेवरची  लढत 
२० वर्षे  झाली  तरीही संपत नाही ? 

No comments:

Post a Comment