Saturday, February 28, 2015

तपासकार्यात दिरंगाई का?


             


            दाभोलकरांची  हत्या झाली त्यावेळेस आधाडी 
सरकार होते तर कॉ. गोविंद पानसरे हत्या  झाली तेव्हा 
सत्तेवर   युतीचे     सरकार   आहे.   अंधश्रद्धा निर्मुलन 
समितीचे  अध्यक्ष      डॉ. नरेंद्र   दाभोलकर     यांच्या 
हत्येला   जवळपास  अठरा   महिने   पूर्ण झाले.युतीचे 
सरकार  सत्तेवर  असल्याने  कॉ. गोविंद पानसरे यांचे 
मारेकरी  लवकर   पकडले जातील   असे    वाटले होते 
पण तसा  तपासकार्याला वेग नाही.या  दोन्ही पक्षांच्या 
प्रशासनात   तपासाची   कार्यवाही   एकाच दिशेने होत 
असल्याने   मारेकरी  अजून कसे पकडले जात नाहीत 
याचा   सर्वांनी विचार   करण्याची    वेळ आलेली आहे.
दाभोलकर,  पानसरे    समाजातील     कुप्रवृत्तींविरूद्ध 
संघर्ष  करत  होते.धर्मवादाचे  राजकारण  पुढे   करीत 
हल्लेखोर पकडण्यासाठी  दिरंगाई  होत  आहे.राज्यात 
अभिव्यक्ती  स्वातंत्र्याची   गळचेपी   करणारी शक्ती 
कार्यरत असल्याने हल्लेखारे पकडले  जात नाही.अशा 
शक्तींचा  कठोर कारवाई   करून वेळीच   बंदोबस्त न 
केल्यास 'लेखणी'पेक्षा 'बंदूक' वरचढ होण्याचाच धोका 
आहे.हे   हल्ले   रोखता आले नाही हे दोन्ही  सरकारचे 
अपयश आहे.आरोपींना पकडणे  तसे व्यवस्थेपुढे फार 
मोठे आव्हानच आहे

No comments:

Post a Comment