Saturday, February 28, 2015

निरर्थक टिका


                        

           उद्योगांसाठी पोषक वातावरण तयार करण्यास
मोदी सरकार अयशस्वी झाल्याची टिका 'एचडीएफसी'चे 
अध्यक्ष दीपक पारेख यांनी केली आहे.एचडीएफसी बँकेला 
भांडवल उभारणी करण्यास संघी न मिळाल्याने ही रागाने 
टीका   केलेली    दिसते.मागच्या सरकारच्या प्रशासकीय 
कामाची तुलना मोदीसरकारच्या कामाशी करीत मागच्या 
सरकार प्रशासकिय कामे योग्य असल्याचे त्यांचे वक्तव्य 
चुकीचे    वाटते.   सरकार   भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन 
करण्यासाठीच   प्रयत्न करीत    असल्याने   प्रशासकिय 
कामाला वेळ लागत आहे.म्हणुन ’मोदींनी नऊ महिन्यांत 
केले काय?’अशी टीका मोठ्या  पदावरच्या प्रतिष्ठिताना 
शोभा देत नाही.पायाभूत सेवा,स्थावर मालमत्ता,पोलाद 
व खनिकर्म,संरक्षण,ऊर्जा आदी क्षेत्रांमध्ये असे गैरप्रकार 
होत   असल्याचे   यांनी    कोणाच्या  निर्दशनात आणून 
दाखवले   आहे का?    मोदी    सरकार काय  नऊ महिने 
हातहातावर    हात ठेवून   बसेल  आहे का? भ्रष्टाचाराने 
बरबटलेल्या देशाला साफ करण्यास सरकारला वेळ दिला 
पाहिजे.तसेच सकारात्मक बदल घडवून  आणायला वेळ 
लागतो.'मेक इन इंडिया' व संरक्षण  सामुग्रींची निर्मिती 
सारखी धोरणे अंमलबजावणी   होणास वेळ लागेल पण 
सुरुवात तर केली आहे   .दीपक पारेख यानी केंद्रसरकार 
चुकत असेल    केंद्राच्या   निर्दशनात   आणून घ्यावे व 
देशातील उद्योग वाढण्यास मदत करावी.

No comments:

Post a Comment