Friday, January 16, 2015

पार्किंगची दरवाढ रद्द करावी.




        मुंबईत वाहतुकी प्रमाणे पार्किंगचा प्रश्न 
गंभीरच आहे.पार्किंगच्या नवीन धोरणाप्रमाणे 
सामान्य विभागातील पार्किंगमध्ये पाच टक्के 
वाढ तर बिझनेस एरियातील दर दुप्पट भरावे 
लागणार   आहेत. तसेच विविध विभाग,तास,
कामाचे व   सुट्टीचे दिवस  आदी बाबी अंतर्भूत 
करत शहर आणि उपनगरासाठी वेगवेगळे दर 
आकारले   जाणार असल्याने  मुंबईकरांनी ही 
पार्किंग दरवाढ सहन  करावी का?पार्किंगच्या 
ठिकाणी वाहनांच्या  सुरक्षेचा   मुद्दा मात्र ह्या
धोरणात   विचारात     घेतलेला           नाही.
मुंबईकरांच्या     हरकती     आणि  सूचना न 
मागवताच    धोरण  अंमलात आणल्याबद्दल 
वाहनमालक    संताप    व्यक्त करीत आहेत.
पार्किंग    झोनमध्ये    कसलीच  सोय नसते.
वाहनांची   सुरक्षा   घेतली जात नसेल तर ही 
दरवाढ रद्द करावी.या दरवाढीने कंत्रादारांचाच 
फायदा होणार आहे.रस्ते कमी  आणि गाड्या 
जास्त    अशी    स्थिती    असलेल्या मुंबईत 
बहुमजली पार्किंगचा लवकरच विचार लागेल.


No comments:

Post a Comment