Sunday, December 21, 2014

दिल्लीत महिला असुरक्षित



      दिल्लीत ग्लोबल कंपनीत एक्झिक्युटिव्ह असलेल्या 
एका  महिलेवर टॅक्सीचालकाने 'निर्भया'प्रमाणे अत्याचार 
करण्याची धमकी देत बलात्कार केला.राजधातीत पाशवी 
बलात्कारबद्द्ल   चार   आरोपींना फाशीची शिक्षा देऊनही 
त्याच गोष्टींची पुवरावृती होते यावरून महीला असुरक्षित 
असल्याचे   दिसून   येते. कडक   शिक्षेची   जरब बसवून 
बलात्काराची प्रकरणे थांबत नाहीत.अत्याचाराचा विचार 
करणाऱ्यांच्या मनात कायद्याचे भय निर्माण  करण्यात 
आपण कमी पडत आहोत का?जागरूक राहून  स्वतच्या 
सुरक्षिततेबाबत    काळजी   घेणाऱ्या  मुलींनाही   आता 
असुरक्षित    वाटतेय.  बलात्कार झाले की तेवढ्यापुरती 
महिलांच्या    सुरक्षिततेबद्द्ल  ओरड होते.पण समाजात 
मुली-महिलांकडे   पाहण्याचा   दृष्टीकोन  बदलत नाही 
तोपर्यत    अशा घटना  घडत राहणार का?गुन्हा आणि 
शिक्षा   यातील अंतर जोपर्यंत कमी होत नाही तोपर्यंत 
आपल्या   देशात गुन्हेगारीचे प्रमाण कमी होणार नाही.

No comments:

Post a Comment