Thursday, November 13, 2014

आशा दाखवण्य़ाची योजना


         देवेंद्र   फडणवीस    यांच्या    नेतृत्वाखालील 
सरकारने  परवडणाऱ्या   घरांची नवी  महत्त्वाकांक्षी 
योजना    कार्यान्वित करण्याचा विचार मांडला आहे.
गेल्या   खुपशा   सरकारने   राज्यातील     जनतेला 
परवडणारी घरे देण्याच्या घोषणा केल्या होत्या.पण  
गगनाला    भिडलेल्या   घरांच्या   किंमतीही खाली 
आणण्यात   कोणतचे   सरकार यशस्वी  झाले नाही.
जनतेला   खुष करण्याची ही एक राजकीय   योजना 
आहे.  स्वस्तात  जमीन   उपलब्ध   न    होणे  हाच 
परवडणारी   घरे मिळण्यातला   मोठा  अडसर आहे. 
राजकारण्यांनीही   बांधकाम   व्यवसायात  मोठ्या 
प्रमाणावर   पैसा    गुंतवला   असून   विकासकांशी ‌
हातमिळवणीतून   घरांच्या   किंमती  कृत्रिमरित्या 
फुगवल्या गेल्या आहेत.घरांच्या विक्रीत सध्या घट 
झाली तरीही जागांच्या किंमती खाली न येण्यामागे 
ही  युतीच   कारणीभूत    आहे.महाराष्ट्र सरकारची 
जबाबदारी   आहे की  त्यांनी सर्व मोकळ्या जमिनी 
ताब्यात   घेऊन   यूएलसीसारखा   कायदा  करावा 
आणि  सहकारी  पद्धतीने घरबांधणीच्या  प्रश्नातून 
परवडणाऱ्या किंमतीतील  घरांचा  प्रश्न   सोडवावा.  

No comments:

Post a Comment