दिल्लीत नेत्रदीपक यश संपादन केल्यानंतर
जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी दिल्लीला पूर्ण
राज्याचा दर्जा देण्याची मागणी नियोजित मुख्यमंत्री
केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. मुंबईला
स्वतंत्र दर्जा,बिहारला विशेष राज्याचा दर्जा,विदर्भाला
स्वायत्त राज्याचा दर्जा तर दिल्लीला पूर्ण राज्याचा
दर्जा अशा वेगवेगळ्या दर्जाच्या मागण्या का होतात?
सध्या केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा असलेल्या दिल्लीला
विकास करण्यास कोणत्या अडचणी आहेत? पूर्ण
राज्याचा दर्जा दिल्यास त्या दूर होतील का?मोठ्या
शहरांचा विकास करण्यास केंद्र सरकारकडून संपूर्ण
सहकार्य मिळत नाही की राजकीय पक्षभेद पाहिला
जात असल्याने वेगळ्या दर्जाची मागणी होते का?
केंद्र सरकारला आपल्या अधिपत्याखाली ही राज्ये
राहावीत म्हणुनच या राज्यांना दर्जा दिला जात नाही
का?जनतेच्या अपेक्षा करण्यास हा दर्जा आड येत
असल्यास केंद्र सरकारने या मागणीचा नक्कीच
विचार करावा.
No comments:
Post a Comment