Wednesday, December 18, 2013

सुरक्षित जोखिम स्विकारावी.




    कावळ्याला वाचवताना जखमी  झालेल्या उमेश  पर्वते 
या अग्निशमन दलातील जवानानी  मृत्यूशी केलेली  झुंज 
अखेर  अपयशी  ठरल्याने वाईट वाटले .कावळ्याचा  जीव 
वाचविताना   स्वतःच्या   जीवाची  पर्वा  न   केल्याने  हा
अपघात घडला व  जीव गमवावा लागला. घटनास्थळाची 
पूर्ण माहीती न करून घेतल्याने त्या प्रसंगी निर्णय चुकीचे 
ठरतात.अग्निशमन दलात आवश्यक उपकरणांचा अभाव 
असल्याने असे जीवावर बेतणा-या प्रसंगाना  सामोरे जावे 
लागते.निष्काळजी किंवा अती आत्मविश्वासाचे परिणाम 
जवानांना भोगावे लागतात.अग्निशमन  दलाने  सुरक्षित 
जोखिम  स्विकारून  एकही  जवान  न गमवता  मोहीमा  
फत्ते करणे अपेक्षित आहे. प्रत्येक  जवानाने  जबाबदारी 
ओळखून सुरक्षित योगदान देणे गरजेचे आहे.

No comments:

Post a Comment