अरविंद केजरीवालांनी नवा पक्ष स्थापन करुन
राजधानीत सत्तास्थापन केल्याने सगळ्या
पक्षांनी चिंता लागली आहे. आता 'आप ' आगामी
लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केल्याने इतर
पक्षाची झोप उडाली आहे.आपले मतदार या पक्षांकडे
ओढले जातील व सत्तेचा घास हिरावला जाण्य़ाची
धास्ती इतर पक्षांना वाटू लागल्याने त्यांच्या गोटात
गडबड सुरु झालेली दिसते. मतदारांना गृहित
घरणा-या राजकारण्यांना 'आप ' या पक्षाने जागे
केले आहे.
ही प्रतिक्रिया दि. १०.०१.२०१४ रोजी 'महाराष्ट्र टाईम्स'या वृतपत्रात प्रसिध्द झाली आहे.
No comments:
Post a Comment